Tuesday 1 December 2020

पळवून लावेल करोना, जो खाईल बेदाणा


आयुर्वेदामध्ये बेदाण्याला महत्त्व आहेच. शरीराची रोजची झीज भरून काढण्यासाठी बेदाणा उपयुक्त तर आहेच, पण जिभेवर रेंगाळणारी चव देण्याची क्षमताही  बेदाण्यामध्ये आहे. च्यवनप्राशसारख्या आयुर्वेदिक औषधामध्ये बेदाण्याचा मूलभूत घटक म्हणून वापर करण्यात येतो. सुक्या मेव्यातील अन्य घटकापेक्षा बेदाणा स्वस्त असल्याने याचा भरपूर वापर यामध्ये करण्यात येतो. बेदाण्याचे आयुर्वेदात अनेक फायदे सांगितले आहेत. पोटॅशियम, लोह, कॅल्शियम यांची शारीरिक गरज बेदाणा पूर्ण करू शकतो. तसेच मूत्रपिंडाचे काम कार्यक्षम करण्यास उपयुक्त ठरतो असे आहारतज्ज्ञांचे मत आहे. दिवसभराच्या श्रमाने शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी २४ तासांत केवळ ३० ग्रॅम बेदाणा उपयुक्त ठरू शकतो. लहान मुलांना पौष्टिक आहार म्हणून बेदाण्याचा वापर उपयुक्त ठरू शकतो. याबाबत अंगणवाडीतील मुलाबरोबरच शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश होण्याची गरज आहे. दरवर्षी सव्वा ते दीड लाख टन बेदाणा उत्पादन होत असताना या वर्षी कोरोनामुळे हे उत्पादन दोन लाख टनांपर्यंत गेले. दिवाळीपर्यंत यापैकी दीड लाख टन बेदाणा विक्री झाली असून दरही प्रतवारीनुसार १०० रुपयांपासून २६५ रुपयांपर्यंत मिळाला. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतची बेदाणा उलाढाल २ हजार कोटींच्या घरात गेली आहे. तासगावच्या बेदाण्याला दोन वर्षांपूर्वी भौगोलिक मानांकन मिळाले. याचाही फायदा यंदा उत्पादकांना झाला. भविष्यात बेदाण्याकडे वळलेला ग्राहक स्वस्तातील बुस्टर म्हणून बेदाण्याकडे कायमचा आकर्षति ठेवण्यासाठी आता प्रबोधन आणि प्रसार करण्याची गरज आहे. ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ अशी जाहिरात करून पोल्ट्री उद्योगाने बस्तान बसवले तसेच ‘पळवून लावेल करोना, जो खाईल बेदाणा’ अशा स्वरूपाचे प्रचारकी वाक्य वापरून बाजारपेठेत बस्तान बसविणे अवघड नाही. करोना संकट नसून एक संधी म्हणून बेदाणा उत्पादकांनी याकडे पाहण्याची गरज आहे.

तासगाव, पंढरपूर आणि विजापूर ही बेदाणा निर्मितीची मुख्य केंद्रे आहेत. यापैकी तासगावचा बेदाणा हा अन्य ठिकाणच्या बेदाण्यापेक्षा सरस ठरतो. याचे कारण इथल्या माती, हवा आणि पाणी यामध्ये आहे. कोरडे आणि शुष्क हवामान, निचऱ्याची जमीन आणि प्रदूषणमुक्त पाणी हे मूलभूत घटक मुबलक असल्याने बेदाण्याचा दर्जा कायम ठेवण्यात येथील शेतकरी यशस्वी होतीलच, पण कष्टाळू शेतकरी प्रयोगशाळेतील संशोधनापेक्षा स्वत संशोधक असल्याने अनेक अडचणीवर मात करीत बेदाण्याचा उत्तम दर्जा राखण्यात यशस्वी ठरले आहेत. या परिसरात हिरवा आणि पिवळा अशा दोन पद्धतीचा बेदाणा तयार करण्यात येतो.  फळछाटणीनंतर किमान १२० दिवस झाल्यानंतर द्राक्ष मण्यामध्ये साखर निर्मिती होते. बेदाण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या द्राक्षामध्ये २२ ब्रिक्स आढळले, की माल बेदाण्यासाठी तयार झाल्याचे मानले जाते. द्राक्ष वेलीवरून काढल्यानंतर त्यातील पाण्याचा भाग लवकर निघून जावा यासाठी डिपिंग ऑइल आणि पोटॅशियम काब्रेनेटच्या द्रावणामध्ये बुडवले जाते. त्यानंतर सुकविण्यासाठी रॅकवर द्राक्षे पसरली जातात. जर तपमान ३० ते ३२ सेल्सियस असेल तर नवव्या दिवशी बेदाणा तयार होतो. जर पिवळा हवा असेल तर गंधकाची धुरी दिली जाते. ज्या बेदाण्यात गर आणि गोडी जास्त, चिकटपणा कमी एकसारखा गोल बेदाणा असेल तर तो उत्तम दर्जाचा बेदाणा मानला जातो. ज्या द्राक्ष मण्यामध्ये पाणी जादा असते गर कमी असतो, तो निम्न स्तराचा बेदाणा म्हणून प्रतवारी निश्चित करता येते. प्रतवारीनुसार बेदाण्याचे दर निश्चित होते.

Saturday 14 November 2020

नाचणी,बाजरी, मका, ज्वारी शरीराला पोषक नाचणी


नाचणीला काही भागात नागली असे म्हणतात. नाचणीचा रंग गडद तपकिरी असून चव उग्र नसते. त्यामुळेच गहू, ज्वारी, तांदळाचे जसे गोड आणि तिखट पदार्थ बनविता येतात, त्याप्रमाणे नाचणीचे सुद्धा गोड व तिखट पदार्थ बनविता येतात. नाचणीचा उपयोग करून पारंपरिक पदार्थांचे पोषण मूल्य वृद्धिंगत करता येते. नाचणीमध्ये तंतुमय पदार्थ जास्त असल्याने नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे नाचणी मधुमेही व्यक्तींसाठी खूप उपयोगी आहे. कारण ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणारे पदार्थ रक्तातील साखर एकदम वाढू देत नाहीत आणि त्यामुळे रक्तशर्करेवर नियंत्रण राहते. मधुमेह पीडित तसेच लहान मुलांच्या आहारात बाजरी प्रमाणेच नाचणीचा समावेश करावा म्हणजे अनेक पोषकतत्त्वे मिळू शकतात. लहान बालके व आजारी व्यक्तींना नाचणीची पेज किंवा सत्त्व दिले जाते. सध्या बाजारात नाचणीचे अनेक मूल्यवर्धित पदार्थ मिळत आहेत. त्यामध्ये नाचणी बिस्किटे, सत्त्व, केक, पापड, शेवई इत्यादींचा समावेश आहे. त्यामुळे आहारात याचा वापर करावा. नाचणीयुक्त अन्नपदार्थांचा वापर हा लहान मुले आणि गरोदर स्त्रिया यांनाही अतिशय लाभदायक ठरतो. वाढत्या वयांच्या मुलामुलींना सुद्धा या पोषण द्रव्यांची जास्त गरज असते. नाचणीयुक्त आहाराने ही गरज भरून काढता येते. नाचणी पचायला हलकी असते. आजारातून उठलेल्या व्यक्तींना नाचणी खायला देतात यामुळे शक्ती किंवा कमजोरी भरून निघते. यामुळे भूक नियंत्रण होण्यास मदत होते. गूळ व नाचणीच्या पिठापासून तयार केलेला हलवा लहान मुलांसाठी शक्तिवर्धक असतो.

बाजरी

बाजरीमध्ये मॅग्नेशिअम, फॉस्फरससारखे अनेक पोषक घटक असतात. वार्धक्याच्या काळात बाजरीची भाकरी तर शक्तिवर्धक व पोषक आहे. आयुर्वेदानुसार बाजरी उष्ण असते, त्यामुळे तिचे सेवन हिवाळ्यात करणे फायदेशीर असते.  बाजरीची भाकरी, गुळाचा खडा व तूप हा आवडीचा आहार आहे. बाजरीची भाकरी व उडदाच्या डाळीची आमटी हा हिवाळ्यातील अतिशय पौष्टिक आहार आहे. शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्या लोकांसाठी बाजरी हा मुख्य आहार आहे. बाजरी हे धान्य खाद्य पदार्थांबरोबरच अनेक औद्योगिक उत्पादनांमध्ये देखील वापरली जाते.

मका

मका हे आपल्या आहारात अन्नधान्य म्हणून तसेच जनावरांसाठी चारा आणि पशुखाद्य आणि औषधी क्षेत्रात बहुउपयोगी अशा तीन प्रकारे उपयोगी पडते. यामध्ये व्यापारीदृष्ट्या महत्त्वाची रसायने आहेत. मक्याच्या दाण्यात १२ टक्के भाग अंकुराचा असतो. या अंकुरापासून तेल मिळते. विविध प्रकारच्या प्रक्रिया करून अनेक प्रक्रिया पदार्थ आणि औषधी उत्पादने तयार करता येतात. मक्यावर प्रामुख्याने दोन प्रकारे प्रक्रिया (मिलिंग) करता येते. कोरडी प्रक्रिया आणि ओली प्रक्रिया. कोरड्या प्रकारात अंकुरविरहित प्रक्रिया करून मक्याची कणी, रवा, पीठ, पोहे, तेल आणि पशुखाद्य तयार करता येते. मक्यावर ओली प्रक्रिया करून स्टार्च, साखर, तेल काढतात. या ओल्या प्रक्रिया पद्धतीने मिळालेला स्टार्च साखर-तेल-पेंड यांचा वापर कापड, कागद, औषधे, बेकरी या व्यवसायात केला जातो. ज्वारीची भाकरी गोडसर चवीची, चांगल्या टिकवण क्षमतेची, आकर्षक, पांढऱ्या रंगाची असते. या भाकरीतील प्रथिनांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि खनिजद्रव्ये अधिकतम आढळतात. ज्वारीची भाकरी ही पचण्यास अतिशय हलकी आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे रोज शक्य नसेल तर आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा तरी ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा. ज्वारीचे पदार्थ खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सर नियंत्रणात राहतो, असे अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. ती ऊर्जा दिवसभर कामी येते.  कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमधील पोषकद्रव्ये पाहता ज्वारीचा आहारात उपयोग केल्यास आहारातील पोषक मूल्यांचे संतुलन योग्य ठेवण्यास मदत होते.

ज्वारीची भाकरी

आहारात तंतुमय घटकांचे महत्त्व  तंतू हे झाडांच्या कोशिकाचे एक घटक असतात. तंतुमय पदार्थ आपल्या आहाराचे एक अंश देखील आहेत. तंतूचे आरोग्यासाठीचे चांगले फायदे आहेत. तंतुमय घटक पाणी शोषून घेतात. ते स्थूलतारोधक असतात. ते आपल्या अन्नाला पाचन नलिकेत जास्त तीव्रतेने संक्रमित करण्यास मदत करतात. एकूणच पचन क्रियेस मदत होते. हे पदार्थ कोलेस्टेरॉलचा (पित्त द्रव) देखील नाश करतात. तंतुमय पदार्थहृदय रोग असणाऱ्या लोकांच्या आहारात असणे फायदेशीर असते.  सर्वच भरड धान्यांमध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असल्यामुळे आरोग्यास फायदेशीर असतात.


Friday 30 October 2020

कवठ


कवठ साधारण छोट्या नारळासारखं दिसतं, त्याला इंग्लिशमध्ये 'वूड अॅपल्स' म्हणतात.कवठ हे रुटेसी कुळातील फळ आहे. कवठाची साल हिरवट पांढऱ्या रंगाची खरबरीत व जाड असते. तर त्याच्या झाडाची पाने आकाराने बारीक असतात. कवठाच्या आतील गर विटकरी रंगांचा असून चवीला आंबट-गोड असतो.  ते पिकलेलं आहे की नाही, हे बघण्यासाठी त्याची 'बाउन्स टेस्ट' उपयोगी पडते. ते कठीण पृष्ठभागावर पाडा. ते बाउन्स झालं, तर त्याचा अर्थ ते पिकलेलं नाही. पिकलेलं असेल, तर ते जमिनीवर एक विशिष्ट आवाज करून पडेल आणि बाउन्स होणार नाही. पूर्णपणे पिकलेल्या कवठाचा गर फिकट करड्या किंवा 'टॉफी माकन' रंगाचा असेल. कवठ हा विटा-कॅरोटिनचा अतिशय उत्तम स्रोत आहे. हे बिटा-कॅरोटिन शरीरात व्हिटामिन 'ए'मध्ये रूपांतरित होतं. कांती नितळ होणं आणि दृष्टी क्षीण न होणं, यासाठी ते उपयोगी पडतं. कवठात व्हिटामिन 'सी' चांगल्या प्रमाणात असल्यानं ते रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी पडू शकतं. संसगांशी लढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. या फळातून रायबोफ्लेविन, कॅल्शिअम, आयर्न आणि फॉस्फरस ही खनिजही मिळतात. कवठ हे शीतकारी, पाचक फळ आहे. पचन वाढवणं, यकृत आणि मूत्रपिंडं 'क्लिन्झ' करण्यासाठी ते उपयोगी पडतं. या फळात अँटी-मायक्रोबिअल गुणधर्म असून, ते खाल्ल्यामुळे घशाला बरं वाटतं. कवठ पचनसंस्थेचं रक्षण करतं. पोटामध्ये अल्सर होतो तेव्हा ते उपयोगी पडतं. अपचन आणि बद्धकोष्ठता यांच्यावर गुणकारी ठरतं. प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात आणि स्नायूंना झालेली दुखापत कमी करण्यासाठी उपयोग होतो. चयापचयाला बळ मिळतं. त्वचा आणि केसांसाठी चांगलं आहे.  कवठ प्रामुख्याने पिकलेलेच खावे. कच्चे कवठ खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि डोकेदुखी होऊ शकते. पिकलेल्या कवठाची चटणी छान लागते, यासाठी  कवठ फोडा आणि त्यातल्या गरातले मोठे तंतू काढून टाका. हा गर हलके स्मॅश करा आणि त्यात तीन टेबलस्पून गूळ, चिमूटभर हळद, तिखट, मीठ, हिंग आणि जिरे घाला. हे सगळं मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या. झाली तुमची चटणी तयार! जेवणात वापर करा.


Thursday 15 October 2020

दीर्घ श्‍वसनाचे फायदे


श्वास म्हणजे जगणे. आणि तेच दुर्लक्षित केलं जातं. ज्या प्रमाणात श्वसन करायला हवे ते होत नाही आणि मग परिणाम आरोग्यावर दिसायला लागतात. जेव्हा जेव्हा आपल्याला उसंत असते तेव्हा तेव्हा दीर्घ श्वास घ्यायला हवे. व्यायामाचा भाग म्हणून नाही तर जगण्याचे एक रूटीन करायला हवे. व्यायाम, प्रणायम आले की बरीच जन कंटाळा करतात. पण त्यातच संपूर्ण आरोग्य दडलेले आहे. कमीत कमी दीर्घ श्वसन तरी करायलाच हवे. त्याचे फायदे काय असतात ते पाहूया. शरीरातील 70 टक्के विषारी घटक हे श्‍वसनाद्वारे बाहेर टाकले जातात. यामुळे शरीरातील बाकी संस्थांचे हे काम वाचते व आरोग्य उत्तम राहते. मेंदूवरील ताणही कमी होतो. थकवा आल्यास किंवा ताण आल्यास ताठ बसावे व दीर्घ श्‍वसन करावे. यामुळे ताण काही वेळातच हलका होईल. दीर्घ श्‍वसनामुळे शरीरही आरामदायक स्थितीत येते. त्यामुळे शरीरातील स्नायूंना आलेला अनावश्यक ताण नाहीसा होतो व स्नायू सैलावतात. रक्‍तातील हिमोग्लोबीनचा स्तर वाढतो  त्यामुळे शरीरात रक्‍त प्रवाह वाढून शरीरातील प्रत्येक भागाला त्याचा फायदा होतो खासकरून पचनक्रिया सुधारण्यासाठी दीर्घ श्‍वसनाचा खूप फायदा होतो. शरीरातील पेशीन् पेशी कार्यक्षम होते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्‍तीही सुधारते.फुफ्फुसांचा पूर्ण वापर होतो, त्यामुळे  फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते.श्‍वसन दीर्घ झाल्यामुळे रक्‍तात ऑक्सिजन मिसळण्यासाठी व शरीरात रक्‍तपुरवठा करण्यासाठी हृदयाला जास्त कष्ट करावे लागत नाहीत. त्यामुळे हृदयावर ताण येत नाही व त्याचे आरोग्य उत्तम राहते. दीर्घ श्‍वसन केल्यामुळे मणका, मेंदू व मज्जारज्जू इत्यादींमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होऊन त्यांची कार्यक्षमता सुधारते. दीर्घ श्‍वसन केल्यामुळे रक्‍तातील कार्बन डायऑक्साईड बाहेर पडते व रक्‍तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने रक्‍त शुद्ध होते. असे आहे दीर्घ श्वसनाचे फायदे. तर मग आतापासूनच प्रारंभ करा... यासाठी कुठेही जायची गरज नाही. आहे त्या स्थितीत फक्त श्वसन कडे लक्ष केंद्रित करून दीर्घ श्वास घेऊन बघा आणि दोनच मिनिटात फरक जाणवेल.

Tuesday 7 July 2020

जायफळाचे सेवन करण्याचे फायदे

अनेक विकारांवर केल्या जाणार्‍या घरगुती उपचारांमध्ये जायफळाचा उपयोग फार जुन्या काळापासून चालत आला आहे. जायफळामध्ये बॅक्टेरियाचे संक्रमण रोखणारी तत्वे असून यामध्ये अँटी ऑक्सिडंट्सचे प्रमाणही मुबलक आहे. त्यामुळे याच्या उपयोगाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. आयुर्वेदानुसार जायफळ अनेक विकारांवर गुणकारी आहे. अपचन, गॅसेसमुळे पोट फुगल्यास किंवा पचनासंबंधी इतर तक्रारी असल्यास दोन मोठे चमचे जायफळाची पूड आणि पाव चमचा सुंठ पूड एकत्र करावे. भोजन करण्याच्या अर्धा तास आधी या मिर्शणातील १/८ चमचा पावडर गरम पाण्यासोबत सेवन करावी. तसेच ज्यांना अपचनाचा त्रास वारंवार होत असेल त्यांनी एक कप उकळत्या पाण्यामध्ये तीन वेलदोडे, पाव चमचा सुंठ पूड आणि एक चिमुटभर जायफळाची पूड घालून हे मिर्शण चांगले उकळावे आणि या काढय़ाचे सेवन करावे.

जेवताना मांडी घालून बसण्याचे फायदे

जेवायला जमिनीवर मांडी घालून बसल्याने अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते. जमिनीवर ताट ठेवून जेवताना अन्नाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते. या होणार्‍ा शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंवर दाब पडतो. त्यामुळे पचनाची क्रिया सुधारते. जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व जेवणावर अधिकाधिक लक्ष केंद्रित होते. त्यामुळे मेंदू शांत होतो. यामुळे अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते आणि वजनही काबूत राहते. पद्मासनात जेवायला बसल्याने पाठ, कंबर आणि पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते.

Thursday 25 June 2020

योगासनाच्या मार्गदर्शनासाठी अॅप

योगी फाय (YogiFi)
पर्सनलाईज योगासनाच्या प्रशिक्षणासाठी हे अॅप प्रचंड लोकप्रिय आहे. नियमित सत्रांशिवाय लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच गर्भवती महिलांसाठी फायदेशीर असणारी योगांची सत्रेही इथे उपलब्ध आहेत. प्राथमिक पातळीवर वॉर्मअप्स, प्राणायाम, वेगवेगळ्या प्रकारची आसनांची विविध सत्रे निश्चितच फायदेशीर आहे. विशेष म्हणजे, अगदी प्राथमिक पातळीपासून योग शिकायचा असल्यास तीही सुविधा इथे उपलब्ध आहे. याशिवाय तुमच्या नियमित योगांच्या सत्रांचे विश्लेषण शेवटी दिले जाते.

Saturday 20 June 2020

योगा सर्वांसाठी उपयुक्त

पूर्ण जगाने योगशास्त्राला डोक्यावर घेतले आहे. एकविसाव्या शतकातील संगणकाच्या युगामध्ये प्रत्येक जण ताणतणावग्रस्त होतो आहे. बदलती जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे ऐन तारुण्यात कामातील कार्यक्षमता आणि गुणवत्ता यावर विपरीत परिणाम होत आहे. या दुष्टचक्रातून सुटण्यासाठी अनेक जण योगसाधनेकडे धाव घेत आहेत. योग हा कल्पवृक्ष आहे. योगामुळे विविध आजारांतून मुक्तता होते. उच्चरक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, मणक्याचे आजार, मानसिक ताणतणाव,  अनेक आजारांवर योगा हा रामबाण उपाय आहे.

Tuesday 16 June 2020

असे ठेवा मधुमेहाला दूर

आजकाल अबालवृद्धांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे. मधुमेहामध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते. त्यामुळे इन्सुलिनच्या निर्मितीवर परिणाम होतो. आपल्या दररोजच्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून मधुमेहावर नियंत्रण करता येऊ शकते. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज कडू गोळ्या-औषधे खाण्यापेक्षा हे काही घरगुती उपाय करून पाहा
* तुळशीची पाने- तुळशीच्या पानांमध्ये मधुमेहासाठी आवश्यक असणारे अँटिऑक्सिडेंट आणि तेल असते. त्यामुळे शरीरात युजेनॉल, मेथल युजेनॉल आणि कॅरियाफोलिनच्या वाढीस मदत होते. या घटकांमुळे पॅकिअॅट्रिक बीटा सेल्सचे (इन्सुलिनचा साठा व नियंत्रण करणाऱ्या पेशी) कार्य सुरळीत होऊन इन्सुलिनची संवेदनक्षमता वाढते. तसेच तुळशीच्या पानांमधील अँटिऑक्सिडेंट्समुळे तणावावर नियंत्रण राहण्यास मदत होते.

अशी घ्या उतार वयात काळजी

जसजसं वय वाढत जातं, तसतशी शरिरात कॅल्शियम निर्मितीची प्रक्रिया मंदावते. परिणामी एखादं हाड फॅक्चर झालं, तरी मग ते भरुन येण्यास वेळ लागतो. त्यामुळे उतारवयात अधिक काळजी घ्यावी लागते. वयोवृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिकांमधील विकलांगता आणि आजाराचे प्रमुख कारण म्हणजे हे लोक खूपच अशक्त झालेले असतात.या अशक्तपणाचे मुख्य कारण बऱ्याचदा कुपोषण किंवा पोषक आहाराची कमतरता हे असते. अशावेळी या लोकांना पुरेसा योग्य आहार आणि पूरके दिली गेली तर अशक्तपणाचा धोका कमी होतो.

दालचिनी, आले आणि दही खाण्याचे फायदे

* दालचिनीचे फायदे- दालचिनीचे झाड सदाहरित आणि छोट्या झुडपासारखे असते. पूर्ण वाढलेले झाड ६ ते १५ मी. उंचीचे असते. त्यांच्या खोडाची साल निवडून घेऊन वाळवतात.त्यांचा आकार कौलासारखा गोल, जाड, मऊ आणि तांबूस रंगाचा असतो. दालचिनीची पैदास कोणत्याही प्रकारच्या जमिनीत होऊ शकत असल्याने अत्यंत सुपीक जमिनीपासून मुरुमाड, रेताड जमिनीत दालचिनी पिकते. दालचिनी हे बागायती पीक असले तरीदेखील समुद्रसपाटीपासून १००० मी. उंचीवर हे पीक कोठेही घेतले जाते.

Sunday 14 June 2020

आला पावसाळा,तब्येत सांभाळा

उन्हाने अंगाची लाही लाही होत असतानाच आकाशात
ढगांनी गर्दी केली. अचानक पावसाच्या धारा बरसू लागल्या. अशा हवामान बदलाचा परिणाम थेट आरोग्यावर होतो. अशा वेळी तब्येतीची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण सर्वाधिक असते. म्हणून वापरातील सर्व पाण्यावर किमान तुरटी फिरवून ते वापरावे. अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांच्यासारखे जलजन्य आजार हे या दिवसांत अधिक पसरतात. लहान मुलांना त्याची लगेचच बाधा होते. पावसाळ्यामध्ये संसर्गाची भीती अधिक असते. पाण्याच्या शुद्धतेबरोबर अन्य कारणांमुळेही हा प्रादुर्भाव होत असला तरीही रोगराई झपाट्याने पसरू नये, यासाठी स्वच्छता ठेवणे मुख्य प्रतिबंधक उपाय आहे.

Tuesday 9 June 2020

खडी साखर खाण्याचे फायदे

खोकला असो किंवा घसा खवखवत असो अशा वेळी खडीसाखरेचे सेवन लाभदायक असते. घसा खराब झाल्यावर तो खूप दुखतो तेव्हा साखर खाल्ल्याने आराम मिळतो. खडीसारखेमध्ये गोडवा आणि थंडावा असे दोन्ही गुण असतात. उन्हाळ्यात नाकातून रक्त येते त्यासाठी खडीसाखरेच्या पाण्याचा वास घेतल्यास फायदा होतो. लोणी आणि खडीसाखर हे समप्रमाणात घेऊन हात आणि पाय यांना लावल्यास जळजळ कमी होते. खडीसाखरेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्मरणशक्ती वाढते आणि शरीराला थंडपणा मिळतो.

काकडी खाण्याचे फायदे

काकडीमधील कमी कॅलरीजमुळे डाएटमध्ये याचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो. काकडीमध्ये पाण्याची मात्रा आणि फायबर अधिक असल्याने वजन कमी करण्यात काकडी उपयोगी ठरते. मध्यम आकाराच्या काकडीपासून केवळ २५ कॅलरीज मिळत असल्याने आहारात सेवन करून किशोरवयातील मुलांना वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवणे सहज सोपे होते. महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीत तर काकडीचे अनेक खाद्यप्रकार आढळतात. जसं कोशिंबीर, सॅलड, काकडीचे थालीपीठ, चटणी किंवा कढीमध्ये काकडी, घावन. अगदी रोजच्या नाश्त्यातील सँडविचमध्ये आपण आवर्जून काकडी वापरतो.

Saturday 6 June 2020

पावसाळा आणि संसर्गजन्य साथीचे आजार

पावसाळ्यात डबकी साठल्याने त्यात अॅनाफेलिस डासांची पैदास होऊन त्यांच्या दंशामार्फत मलेरिया पसरतो. पावसाळ्यात घरांमध्ये, घरातल्या कुंड्यांमध्ये किंवा टेरेसवर ठेवलेल्या निरुपयोगी वस्तूंमध्ये किंवा रस्त्यावर फेकलेल्या टायरमध्ये स्वच्छ पाणी साठल्यास त्यात एडीस इजिप्ती डास निर्माण होतात. त्यांच्याद्वारे डेंगीचा आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव होतो. घरात, छपरावर, आपल्या आजूबाजूस स्वच्छ पाणी साचू न देणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
जी गोष्ट डासांची तीच माश्यांची. वैयक्तिकरीत्या आणि सार्वजनिक पातळीवर स्वच्छता न राखल्याने माश्या निर्माण होतात. त्यांच्यापासून रोगांचा प्रसार होतो. उलट्या-जुलाब, कॉलरा, कावीळ, टायफॉईड अशा विविध रोगांना आम जनता बळी पडते.

पावसाळा आणि पोटाचे आजार

पावसाळ्यात उलट्या, जुलाबांचे आजार वाढतात. हे केवळ मानवाच्या बेशिस्तीमुळे, बकालपणामुळे आणि अस्वच्छतेने पसरणारे आजार असतात. पावसाळ्यात जलाशयांमधील पाण्याची पातळी ढवळून निघते. हे अस्वच्छ गढूळ पाणी पिण्यात आल्यास उलट्या, जुलाब, मळमळ, आमांश असे रोग होतात. अनेकदा नळातून पिवळट पाणी येते. घराबाहेर पाणी पिताना अस्वच्छ जागी साठवणूक करण्यात येणारे पाणी प्यायल्यानेही असे त्रास होतात. खराब पाण्यात पोहताना पाणी तोंडातून जाऊन हे त्रास होतात.

Friday 5 June 2020

पावसाळा आणि श्वसन विकार

पावसाळ्यात आरोग्याच्या तक्रारी खूप उद्धवतात, पण त्यासाठी आपणच जबाबदार असतो. आपण विशेष खबरदारी घेत नाही, म्हणून हे आजार आपल्याला होतात. तसे पाहिले, तर हिवाळ्यातली थंडी सर्वत्र पसरते, अगदी दारे खिडक्या बंद केलेल्या घरातही. त्या थंडीच्या परिणामाने आपल्या तब्येतीवर परिणाम होतात, तिच गोष्ट उन्हाळ्यात घडते. आपण घरात बसूनही उष्णतेच्या झळा आपल्याला छळत राहतात. उन्हाळ्यात होणारे डीहायड्रेशन आपल्याला चार भिंतीत राहूनही त्रास देते; पण पावसाळ्याचे तसे नाही. प्रतिबंधक उपाय न केल्याने पावसाळ्यात निरनिराळे आजार उफाळून येतात.

Wednesday 3 June 2020

खजूर खाण्याचे फायदे

कोरोनाच्या या दिवसात रोगप्रतिकारक शक्ती वाढणे फार गरजेचे आहे. खनिजं, जीवनसत्वं अशा अनेक पोषकद्रव्यांनी समृद्ध असा खजूर आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी समजला जातो. खजुरात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीसाठी खजूर उपयुक्त असतो. म्हणूनच प्रत्येकाने नियमितपणे खजूर खायला हवा. तर जाणून घेऊ यात खजुराचे फायदे..

Monday 1 June 2020

गूळ आणि खोबरे

'हेल्दी घटक' आपल्या आजूबाजूलाच व आपल्या आहारात पूर्वकाळापासूनच आहेत. फक्त आपल्याला कधीकधी इतर गोष्टींच्या प्रभावामुळे त्यांचा विसर पडतो. असेच काहीसे नारळ व गुळाचे झालेय.'नारळ व गूळ'. साधारण, परंतु अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारळाच्या झाडाला आपण 'कल्पवृक्ष' म्हणतो. कारण झाडाचा प्रत्येक भाग मनुष्याच्या कामास येतो. शिवाय आपली धार्मिक, सांस्कृतिक व मंगलकार्ये नारळाशिवाय तर अपूर्णच आहेत. शुभ कार्याची सुरुवात नारळ वाढवून, तर एखाद्याला निरोप देतानाही नारळच दिला जातो. वजन वाढेल, कोलेस्ट्रेरॉल वाढेल या अपप्रचारामुळे नारळ अनेकांनी जेवणातून हद्दपार केल्याचे मी पाहिले आहे.

Sunday 31 May 2020

कफ-खोकल्यावर घरगुती उपाय

पावसाळा म्हटलं की भिजणं आलं आणि भिजल्यावर आधी सर्दी व त्यामागून खोकला येतोच. सर्दी दोन दिवसांत बरी होते, पण खोकला बरेच दिवस सतावतो. अशावेळी काही घरगुती उपाय असतात ते पाहुया. गरम दुधात एक चमचा हळद घालून ते दूध प्यावं. हा उपाय सगळ्या वयोगटांसाठी उपयुक्त ठरतो.हळद अँटिव्हायरल आणि अँटिबॅक्टेरिअल असते, जी घशातल्या खवखवीशी लढण्यास मदत करते.

Tuesday 26 May 2020

मेथीदाणे सेवनाचे फायदे

मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते. मेथीदाणे अँनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणार्‍या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये बहुमूल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतासमान आहेत.

Sunday 24 May 2020

अशी कमी करा चिडचिड

चिंता आणि तणाव आपल्या आरोग्यावर खूप परिणाम करतात. अनेक कारणांमुळे अनेकांना चिडचिडेपणाला
सामोरे जावे लागते. कामाचा व्याप,दगदग, वरिष्ठांची बोलणी अशा अनेक कारणांमुळे चिडचिड वाढते, मात्र हा सगळा राग, चिडचिड ही घरातील सदस्यांवर, कुटुंबावर होते. घरातले म्हणतात, बाहेरची कामे वगैरे बाहेरच आवडून यायचे, घरात आणायचे नाही, पण तसे घडत नाही.

पाणी पिण्याचे नियम आणि फायदे

पाण्याने केवळ तहान भागत नाही तर ते शरीरातून
घातक रसायनदेखील बाहेर काढण्यात मदत करतं.
ज्या प्रकारे अंघोळ केल्याने बाह्य शरीराची सफाई
होते त्याचप्रमाणे पाणी पिण्याने आतल्या शरीराची
सफाई होते.

Saturday 23 May 2020

शांत झोपेसाठी योग संगीत

अनेकदा दिवसभर जास्त श्रम केल्याने किंवा एखाद्या गोष्टीबद्दल मानसिक तणाव असल्यास रात्री शांत झोप लागणे शक्य होत नाही. शरीराला आणि मनाला विश्रांती मिळण्यासाठी शांत, कोणत्याही प्रकारच्या व्यत्ययाशिवाय घेतलेली झोप अतिशय महत्वाची असते. त्यामुळे शांत झोप लागण्यासाठी झोपण्यापूर्वी काही काळ संगीताचा आनंद घेतल्याने निश्‍चित लाभ होईल असे वैज्ञानिकांनी केलेल्या शोधामध्ये निष्पन्न झाले आहे.

Friday 22 May 2020

'तोंड येणे' अशी घ्या काळजी

मला ना सारखं तोंड येतं. मग चांगले पदार्थ खाता येत नाही की, गरम काही पितासुद्धा येत नाही," ही समस्या प्रत्येकाला कधी ना कधी जाणवतेच जाणवते. तोंडाच्या आतील भागात फोड येणे, लाल होणे, काहीही खाताना जिभेची, हिरड्यांची आग होणे, तिखट, खारट आणि आंबट जराही सहन न होणे अशा तक्रारी यात जाणवतात. यात ओठ, जीभ, पडजीभ, घसा, टाळा यांना सूज येते. त्यामुळे आपल्याला काहीही खाता येत नाही आणि नीट गिळतादेखील येत नाही. हे दुखणे फार मोठे नसलं तरी त्याचा त्रास खूप होतो. वारंवार तोंड येण्यावर त्यामुळे वेळीच योग्य ते उपचार घेणे महत्वाचे आहेत.

Wednesday 20 May 2020

असे ठेवा पित्तावर नियंत्रण

पित्त किंवा ऍसिडीटी हे आजकाल अगदी लहान
मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत कोणालाही होताना दिसतात. खाण्या-पिण्याच्या बदललेल्या सवयी आणि वेळा तसेच मानसिक ताणात होत असलेली वाढ, मसालायुक्त पदार्थ, तेलकट पदार्थांचे सेवन करण्याकडे वाढलेला कल, झोपेच्या बदलेल्या वेळांमुळेही पित्ताचे विकार वाढले आहेत. घरच्या घरी काही उपायांव्दारेही पित्ताचा त्रास कमी करता येणे शक्य आहे.

Sunday 17 May 2020

अशी कमी करा पोटाची घेरी

वाढणाऱ्या पोटाची समस्या वा सर्वानाच सतावत असते. आहारावरील नियंत्रण आणि व्यायामाची जोड असेल तर पोटाचा घेर कमी करता येणे शक्य आहे. आरोग्य धावणे, पोहणे, चालणे यांसारख्या जपूया! व्यायाम प्रकाराने शरीरातील उष्मांक कमी करणे शक्य आहे. मात्र वेगाने पोटाचा घेर कमी करण्यासाठी योगासने आणि व्यायामांचे प्रकार केल्यास फरक पडू शकतो. मात्र शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी केवळ व्यायाम पुरेसा नाही, तर योग्य आहार असेल तर ही चरबी कमी करता येणे शक्य आहे.

Saturday 16 May 2020

रोजची दिनचर्या आणि रोग प्रतिकारशक्ती

आयुर्वेदातही रोगप्रतिकार शक्ती जास्त असणार्‍या लोकांच्या जवळ काही विकार फिरकतही नाहीत असे म्हटले आहे. आपली रोगप्रतिकार शक्ती जोपर्यंत चांगली असते तोपर्यंत आपण कोणत्याही विकारांचा सामना करण्यास सज्ज असतो. मात्र रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यास लहान-लहान आजारही उग्र रूप धारण करतात. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नुसती औषधे घेणे आवश्यक नाही तर आपली दिनचर्याही योग्य असायला हवी आणि आहारही. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही टिप्स पाहूया.

भारतीय आहाराचे वेगळेपण आणि गुण

आहार हा शरीराला तृप्त करणारा, शीघ्र बल देणारा असतो. आयु (जीवन), तेज (कांती), उत्साह, स्मृती, ओज (जीवनीय शक्ती) आणि अग्नी वाढविणारा आहे. अन्न हे पूर्णब्रह्म आहे असे मानणारी आपली परंपरा आहे. म्हणजेच धान्य, भाज्या साठविण्यापासून तर ते ग्रहण करण्यापयर्ंत अलिखित नियम आजही अनेक घरांमध्ये पाळले जातात. खरेच त्याला महत्त्व आहे का? आहाराचा परिणाम स्वास्थ्यावर कसा आणि किती होतो?

Friday 15 May 2020

अशी घ्या उन्हाळ्यात काळजी

एकीकडे उन्हाने काहिली तर अचानक बरसणाऱ्या पावसाच्या सरी यामुळे वातावरण बिघडले आहे. अशा बदलणाऱ्या वातावरणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. उन्हाळ्यात सर्वात जास्त त्रास होतो तो उष्माघाताचा. उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की, उष्माघात होण्याची शक्यता असते. उष्माघातामुळे शरीरातील  रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा पुरेसा होत नाही. रक्तातून होणारा ऑक्सिजनचा पुरवठा मंदावल्यामुळे रूग्णाला श्वास घेणे कठीण जाते.

Wednesday 13 May 2020

अशी घ्या पोटाची काळजी

बदलत्या जीवनशैलीत पोटाची समस्या सामान्य झाली आहे. कामानिमित्त, सोशल मिडीयामुळे होणारे जागरण, तळलेले, मसालेदार पदार्थ, शारिरीक श्रमांचा अभाव यांसारख्या अनेक कारणांमुळे पोटाचे  विकार होत असतात. सामान्यतः 90 ते 95 टक्के आजार हे खाण्या-पिण्याशी संबंधित आहेत. त्यामुळे पचनशक्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी, पोटाचे पर्यायाने स्वतःचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

Tuesday 12 May 2020

नृत्य करा, फिट रहा

अनेकांना जीममध्ये जायचा कंटाळा येतो. तिथला व्यायाम वैतागवाणा वाटतो. अशावेळी तुम्ही डान्सिंगचा पर्याय निवडू शकतो. नृत्य हा सुद्धा व्यायामाचा खूप चांगला पर्याय आहे. नृत्याकडे नेहमीच छंद म्हणून बघितलं जातं. पण प्रत्यक्षात फिटनेसच्या दृष्टीने नृत्याचे अनेक लाभ आहेत. नियमित नृत्य केल्याने बर्‍याच कॅलरी खर्च होऊ शकतात. नृत्यप्रकार कोणाताही असला तरी त्याचे तितकेच लाभ होतात. तुम्ही या नृत्याचा आनंद घेणं गरजेचं आहे.

Monday 11 May 2020

अशी घ्या मानेची काळजी

पूर्वी वयाच्या पंचेचाळीस, पन्नास वयाला येणारी
मानदुखी आज वयाच्या २५ ते ३० वयोगटात येऊन
ठेपली आहे. वाढत्या वयाबरोबरच मान दुखीचा त्रास
टाळायचा असेल तर दैनंदिन हालचालींवर विशेष लक्ष ठेवले पाहिजे.

Saturday 9 May 2020

अशी घ्या गुडघ्यांची काळजी

मैलोनमैल धावणं असो की एखादा नवा डान्स करून पाहणं असो, गुडघ्यांशिवाय काहीच करता येत नाही. प्रत्येक हालचालीची धुरा गुडघ्यांवर जपूया! असते. गुडघेदुखीचा त्रास सर्वच वयात जाणवत असला तरी वाढत्या वयासोबत हा त्रास वाढत जातो. गुडघेदुखीमुळे मांडी घालून बसणे, पाय दुमडून बसणे या हालचाली त्रासदायक होतात. तसेच गुडघेदुखी जास्त जाणवते ती जिने चढताना आणि उतरताना किंवा खाली बसल्यावर पुन्हा उठून उभे राहात असताना. वेळीच योग्य ती काळजी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने
उपाययोजना केली तर गुडघेदुखीचा त्रास निश्चीतच कमी होऊ शकतो.

Thursday 7 May 2020

अशी घ्या डोळ्यांची काळजी

दैनंदिन जीवनात सर्वात जास्त वापरले जाणारे इंद्रिय म्हणजे डोळे. प्रत्येक क्षणी कार्यरत राहणाऱ्या डोळ्यांना झोपेपुरतीच विश्रांती मिळते. त्यामुळे आपल्या जीवनशैलीचा सर्वाधिक प्रभाव हा डोळ्यांवर पडतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डोळ्यांची  काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. तसेच लॉकडाउन काळात अनेकांचा स्क्रीनटाईम वाढलेला आहे. त्याचा थेट परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होतो. त्यावेळी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

Wednesday 6 May 2020

.. म्हणून जडतो हृदयविकार

हृदयविकार आणि पक्षाघात या विकारांमुळे भारतात अनेकांचा मृत्यू होतो. अनेक कारणांमुळे आपलं हृदय धोक्यात येतं. हृदयविकाराचा झटका हा अत्यंत धोकादायक असा आजार आहे. हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा कमी होत पूर्णपणे थांबला की हृदयविकाराचा झटका येतो. हृदयाच्या पंपिंगच्या क्षमतेवर परिणाम झाल्याने हृदयक्रिया बंद पडू शकते. यासोबतच हृदयाच्या भित्तीकांशी संबंधित विकार असतात. तसंच हृदयाच्या ठोक्यांची अनियमितताही हृदयविकाराला निमंत्रण देते.

दीर्घ श्वास घ्या... उत्साह...जोम वाढवा!

आपली मानसिक व शारीरिक स्थिती आणि श्वासोच्छवास यांचे  जवळचे नाते असते. शारीरिक व मानसिक स्थितीतल्या बदलांमुळे श्वासोच्यासातही बदल होतो. त्याची गती व खोली वाटते. खेळताना किंवा व्यायाम करताना शरीराला प्राणवायूची गरज वाढलेली असते. अशा वेळी आपला खोल आणि जलद गतीने श्वासोच्यास सुरू होतो. मोठमोठे उसासे टाकतो.

असा टिकवून ठेवा - ट्रेकिंगसाठीचा फिटनेस!

ट्रेकिंगची आवड अनेकांना असते. हिवाळा आणि पावसाळ्यातही ट्रेकिंग मोठ्या प्रमाणावर केले जाते, तर उन्हाळ्यात जास्त उंचीचे ट्रेक केल्याने तब्येत बिघडण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात उष्णतेचे प्रमाण वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात ट्रेकऐवजी जंगल भटकंती, किरले यांवर भ्रमंती केली जाते; मात्र पुढे ट्रेकिंगमध्ये तोच उत्साह कायम ठेवण्यासाठी रोज व्यायाम गरजेचा असतो. सध्या लॉकडाउनमुळे घराबाहेर पडणे शक्य नाही, तरीही ट्रेकिंगमधील फिटनेस तुम्ही घरच्या घरी टिकवून ठेवू शकता.

Tuesday 5 May 2020

वात, पित्त आणि कफ या 'त्रिदोषां'चा विचार करा आणि जीवन जागा

आयुर्वेदात 'त्रिदोष सिद्धांत' ची विस्तृत व्याख्या दिली आहे. वात, पित्त, कफ हे शरीराचे तीन दोष आहेत. या दोषांचा शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे या दोषांनुसार आहाराकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ या 'त्रिदोषा' वर आपलं शरीर चालतं, वाढतं आणि थांबतं. योग्य आणि विरुद्ध आहार-विहार, ऋतूचर्या आणि दिनचर्या यांकडे लक्ष दिलं नाहीतर शरीर अस्वस्थ होतं.

अशी घ्या जिभेची काळजी...

 इतर अंगांप्रमाणे जीभ हेसुद्धा एक महत्वाचं अंग आहे. त्यामुळे जितकी तुम्ही शरीराच्या इतर अंगांची काळजी घेता तेवढीच जिभेची काळजी घेणेही गरजेचे असते. अनेकदा काहींना जिभेवर  लाल डाग दिसतात किंवा काहींच्या जिभेवर निळे किंवा काळे डाग दिसतात. त्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकतं. पचनक्रिया सुरळीत नसल्यामुळे ही समस्या अनेकांना उद्भवते. तोंड येण्याचा त्रासही अनेकांना सहन करावा लागतो.

गरिबांचा काजू: शेंगदाणे

शेंगदाण्याला गरिबांचे काजू असे म्हटले जाते. आरोग्याला फायदेशीर ठरणारे अनेक गुणधर्म असलेल्या शेंगदाण्यांचा आपल्या आहारात समावेश करणे अत्यावश्यक आहे. शेंगदाण्याचे तेल आरोग्यासाठी हितकारक ठरते असे अनेक संशोधनातून दिसून आले आहे. शेंगदाण्यामध्ये व्हिटामिन्स, मिनरल्स आणि अनेक अँटी ऑक्सिडंटस उपलब्ध आहेत. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा तर मिळतेच याशिवाय अनेक आवश्यक पौष्टिक घटकांचा पुरवठाही केला जातो.

Sunday 3 May 2020

पायांचीही काळजी घ्यायलाच हवी!

दिवसभरात आपले पाय काय काय आणि किती सहन करत असतात. दिवसभर कामात असणाऱ्या पायांना आरामाचीही गरज असते. बदलत्या ऋतुमानानुसार पायांची  काळजी घेणे आवश्यक असते. पावले स्वच्छ,  सुंदर, नितळ दिसण्यासाठी करता येण्यासारखे उपाय, नखांची काळजी तसेच घरच्या घरी करता येणे शक्य आहे. हवामानानुसार आपल्या पायांची काळजी घेणे क्रमप्राप्त असते. उन्हाळ्यात त्वचा काळवंडते, हिवाळ्यात कोरडी होऊन फुटते आणि पावसाळ्यात फंगल इन्फेक्शन होते. त्यामुळे ऋतुमानानुसार पायांची काळजी घ्यावी लागते.

Saturday 2 May 2020

प्रदूषण देतेय दम्याला निमंत्रण

मे महिन्याचा पहिला मंगळवार जगभरात दमा दिवस म्हणून ओळखला जातो. यंदा  5 मे म्हणजे हा दिवस साजरा होतोय. फुफ्फुसांचा अतिशय चिवट असा हा आजार आहे. जगभरातील दमेकऱ्यांपैकी जवळपास 10 टक्के दमेकरी भारतीय आहेत. हा रोग थोडा अनुवंशिक असला तरी दम्याच्या वाढत्या प्रमाणामागे प्रदूषण हे  मुख्य कारण आहे. श्वसनमार्गात दाह निर्माण  करणारे वातावरणातले विषाणू आणि  अर्थातच अॅलर्जीला कारणीभूत  असणारे घरातील प्रदूषणकारी घटक  दमा होण्यासाठी धोकादायक ठरू  शकतात.

Wednesday 29 April 2020

उत्तम आवाजासाठी जपा घशाला...

घसा हा अन्नमार्गातील तसेच श्वसनमार्गातील महत्त्वाचा अवयव आहेच. त्यासोबतच आपण ज्यामुळे आवाज काढू शकतो, ते स्वरयंत्र घशातच असते. त्यामुळे घशाची काळजी घेणे जसे गरजेचे असते, तसेच त्याच्या किरकोळ तक्रारीवरही त्वरित उपचार करणे आवश्यक असते. खोकला, सर्दी झाल्यास आवाज बदलतो. अनेकदा घसा बसतो आणि बोलणे अवघड होते. गायनाचा छंद असलेल्यांना तर घशाची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते.

अशी वाढवा रोगप्रतिकार शक्ती

कोरोनाचा फैलाव जगभर वाढला आहे. संसर्गाने होत असलेल्या या आजारापासून वाचायचे असेल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती सक्षम असली पाहिजे, असे तज्ज्ञांकडून वारंवार सांगितले जाते.  रोगप्रतिकार शक्ती नेमकी कशी वाढवायची, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोगप्रतिकार शक्ती सक्षम ठेवण्यासाठी तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही सोप्या पद्धतीनेही कोरोनापासून स्वतःला दूर ठेवू शकता.

Wednesday 22 April 2020

आंबे खाण्याचे फायदे

उन्हाळा आला की फळांचा राजा असलेल्या आंब्याचे देखील आगमन होते. आंबा आवडत नसेल असा व्यक्ती क्वचितच शोधून सापडेल. केवळ स्वाद म्हणूनच नाहीतर आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत.
आंब्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्‍या अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. यामुळे रोगांचा सामना करण्याची शक्ती वाढते. आंब्यात व्हिटॅमिन ए सह बीटा-कॅरोटीन, अल्फा-कॅरोटीन आणि बीटा-क्रिप्टोक्झ्ॉन्थिन सारख्या फ्लॅवोनाईड्सचे देखील प्रमाण अधिक असते. हे फळ नियमित खाल्ल्याने डोळेदेखील चांगले राहतात. ताजे आंबे हे पोटॅशियमचा चांगला स्त्रोत आहेत. त्यामुळे हार्टरेट आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.

Sunday 29 March 2020

गूळ खा,मस्त राहा

गूळ आपल्या आहारात असायला हवा. त्याची कारणे पुष्कळ आहेत. पण आपल्या रोजच्या आहारात कमी अधिक प्रमाणात साखर असतेच. संशोधनातून असे दिसून आले आहे की साखरेपेक्षाही गुळ आरोग्यासाठी अधिक चांगला आहेच पण गुळाच्या सेवनाने तजेलदार त्वचा आणि भरदार निरोगी, चमकदार केस यांचा लाभ होतो. रोजच्या आहारातून कांहीशा उपेक्षित राहिलेल्या गुळामध्ये अँटी ऑक्सिडंट, कॅल्शियम, आयर्न व अन्य अनेक खनिजे आहेत. त्यामुळे त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.

Tuesday 3 March 2020

मुळा खा, आरोग्य सांभाळा

आपल्या आहारात विविध भाज्यांचा समावेश असतो. मुळा हा त्यापैकीच एक. उग्र वासामुळे मुळ्याची भाजी जास्त प्रमाणात खाल्ली जात नसली तरी अधून मधून या भाजीचे सेवन करणे आरोग्यासाठी हितकारी आहे. कारण त्यामध्ये अनेक पोषणमुल्ये आहेत. कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी कारांवर मुळा गुणकारी आहेच त्याचबरोबर सौंदर्यवृद्धीसाठीही मुळ्याचा वापर होतो. जाणून घेऊ मुळ्याचे हे औषधी गुणधर्म..

Sunday 1 March 2020

कढीपत्ताचे औषधी गुणधर्म

कढीपत्ता हा नेहमीच्या स्वयंपाकात वापरला जाणारा घटक असून या गुणकारी घटकामध्ये अनेक गुणकारी गुणधर्म असतात. त्यामुळेच कढीपत्त्याची पाने ताटातून बाजूला काढून न ठेवता खाण्याकडे कटाक्ष ठेवावा. कढीपत्त्याच्या सेवनाने हृदयविकारावर नियंत्रण ठेवता येतं. यातील अँटिऑक्सिडंट्समुळे रक्तातलं कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होतं. मधुमेहावरही कढीपत्ता गुणकारी ठरतो. कारण यात मधुमेहविरोधी घटक असतात. तसंच यातील फायबरमुळे इंन्शुलनचं प्रमाण नियंत्रणात राहून रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी पाच ते सहा कढीपत्ते चावून खावेत.

Monday 24 February 2020

ओव्याचे औषधी गुणधर्म

स्वयंपाकघरात काही पदार्थांचा स्वाद वाढविण्यासाठी ओव्याचा वापर हमखास केला जातो. आजीबाईच्या बटव्यातही ओव्याचा समावेश करण्यात आला आहे. याचं कारण ओव्याचे औषधी गुणधर्म. विशेषत: पोटदुखी वा पोटाशी संबंधित काही विकारांवर ओवा गुणकारी ठरतो, याची बहुतेकांना माहिती आहे. परंतु या व्यतिरिक्तही प्रकृतीच्या तक्रारींवर ओवा गुणकारी ठरतो. ओव्याच्या या गुणधर्माविषयी..

घोरण्याची समस्या: घरघुती उपाय

आपल्या घरामध्ये कुणाला घोरण्याची समस्या असेल तर घोरण्याच्या आवाजामुळे कुटुंबातील इतरांना व्यवस्थित झोपही घेता येत नाही. रात्री झोप झाली नाही की दुसरा त्यांचा संपूर्ण दिवस आळसात जातो. तब्येतीवरही त्याचा परिणाम दिसायला लागतो. घोरणाऱ्या व्यक्तीलाही आपल्यामुळे इतरांना झोप घेता येत नाही याचे वाईट वाटते. पण तो ही काही करु शकत नाही. आज आम्ही आपल्याला असे काही घरघुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे घोरण्याच्या समस्येवर मात करता येईल.