Sunday 11 June 2023

जगा आनंदी... राहा निरोगी...

प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धा दिवसागणिक वाढत आहे. त्याने साहजिकच ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. त्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होऊन जीवनशैली बिघडत चालली आहे. ती सुधारण्यासाठी ताणतणाव कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने आनंद आणि आरोग्य यांची सांगड घालून जीवनशैलीमध्ये बदल करणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. समाजातील

नकारात्मक घटकांपासून दूर राहावे -स्वत:मध्ये करायच्या बदलाबाबत मानसोपचारतज्ज्ञ सांगतात की, चांगले जीवन जगण्यासाठी शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही योग्य असणे महत्त्वाचे आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी या दोन्हींमध्ये समतोल असावा. वाढत्या स्पर्धेमुळे जीवन धकाधकीचे, धावपळीचे बनले आहे. किती जरी नाही म्हटले तरी ताणतणाव राहणारच आहे. मग त्यासोबत आनंदी जीवन जणणे, ते प्रत्येकाने शिकणे आवश्यक आहे. यात पहिल्यांदा समाजातील नकारात्मक  घटकांपासून दूर राहावे. व्यसन करू नये. योग्य आहार घ्यावा, तसेच व्यायाम करावा. कामाच्या ठिकाणी आनंदी वातावरण ठेवण्यावर भर द्यावा. 

पुरेशी झोप, सकस आहार घ्यावा -मानसोपचारतज्ज्ञ सांगतात की, दैनंदिन स्वरूपातील जगणं याला आनंदी ठेवण्याला प्राधान्य द्यावे. ताणतणाव घेऊन काम करू नये. तसे झाल्यास त्याचा कामावर आणि त्याबरोबरच शारीरिक, मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो. पुरेशी झोप घ्यावी. व्यायाम करावा. सकस आहार घ्यावा. वाचन, गाणी ऐकणे, एखादे वाद्य वाजविणे आदी स्वरूपातील छंद असल्यास त्याची आवर्जून जोपासना करावी. वृत्ती आनंदी राहिल्यास आरोग्य निरोगी राहण्यास चांगली मदत होते. 

आनंदी देशांच्या यादीत १२५ वा क्रमांक - संयुक्त राष्ट्रांर्फ जगभरातील आनंदी देशांची यादी जाहीर केली जाते. वर्ल्ड हॅपिनेस रँकिंग ठरविली जाते. यंदा मार्च महिन्यात रॅंकिंग जाहीर करण्यात आले. त्यात फिनलंड देश सलग सहाव्यांदा प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर डेन्मार्क, आइसलँड, इस्त्रायल, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे, स्वित्झर्लंड, लक्‍सेंबर्ग, न्यूझीलंड यांचा क्रम आहे. आपल्या भारत देशाचा क्रमांक १२५ वा आहे. महाराष्ट्रातील लोकांमध्ये सकारात्मकता वाढावी या उद्देशाने सन २०१८ मध्ये राज्य सरकारने मध्यप्रदेश, आंध्रप्रदेशच्या धर्तीवर आनंद मंत्रालय स्थापन करण्याचा विचार केला. 

हॅपिनेस इंडेक्स म्हणजे काय? - हॅपिनेस इंडेक्स म्हणजे आनंदाचा निर्देशांक आहे. या निर्देशांकाचे मोजमाप हे संबंधित देशातील नागरिकांचे वैयक्तिक पातळीवर समाधान, त्या लोकांचे राहणीमान, देशाचे दरडोई उत्पन्न, आयुर्मान असे निकष आहेत. या निकषांचे मूल्यमापन करून तो देश किती आनंदी असल्याचे हे ठरविण्यात येते. या पद्धतीने आनंदाचा निर्देशांक ठरविला जातो. 




No comments:

Post a Comment