Sunday 16 May 2021

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हिरवी मिरची उपयुक्त


सध्या जगावरील कोरोनाचे संकट आणखी गंभीर होताना दिसत आहे. अशा संकटकाळात आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. याशिवाय विशेषज्ज्ञ लोक काय खावे आणि काय खाऊ नये? याबद्दल मार्गदर्शन करताना दिसतात. मात्र, कोरोना काळात आपले शरीर मजबूत करून प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हिरवी मिरची अत्यअंत उपयुक्त एका नव्या संशोधनात आढळून आहेत. मात्र, जर तुम्ही रोज हिरव्या मिरचीचे सेवन करत असाल तर तुम्हाला त्याचे फायदे माहीत नसणार. खाण्यात तिखटपणा आणणारी ही मिरची आरोग्यासाठीही तितकीच उपयुक्त आहे.  नियमितपणे हिरवी मिरची खाऊन आपण  अनेक आजारांना दूर ठेवू शकतो.  हीच हिरवी मिरची वजन कमी करण्यापासून ते ब्लड सर्क्युलेशन सुरळीत आणि वेगाने करण्यास मदत करते. हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए, बी ६, आयरन, कॉपर, पोटॅशियम, प्रोटिन आणि कार्बोहायड्रेटचे भरपूर प्रमाणात असतो. याशिवाय यामध्ये बीटा कॅरोटिन, क्रिप्टोक्सान्सिन, लुटेनजॅक्सन्थिन आणि आरोग्यवर्धक घटक असतात. जे शरीर तंदुरुस्त ठेवण्यात मदत करतात.

कोरोनाकाळात तर विशेषज्ज्ञ हिरवी मिरची खाण्यास प्राधान्य द्या, असा सल्ला देताहेत. याचे कारणही तसेच आहे. हिरव्या मिरचीमध्ये इम्युनिटीला मजबूत करण्याची क्षमता असते. याशिवाय यामध्ये अँटिबॅक्टेरियल गुण असतो. त्यामुळे आपले शरीर बॅक्टेरियापासून दूर राहू शकते. तसेच या मिरचीमुळे रक्त शुद्ध होते व ते वेगाने प्रवाहीत होण्यास मदत मिळते.

 मिरची खाण्याचे आणखीही काही फायदे – भाजीसोबत खाल्ली जाणारी  हिरवी मिरची आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मिरचीमध्ये व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते. हिरवी मिरची आपल्या पचन तंत्रासाठी खूप लाभदायक आहे. आपल्या अन्नामध्ये फायबर अधिक प्रमाणात आढळते.  हिरवी मिरची  फायबर पचवण्यास मदत करते. हिरवी मिरची ब्लड शुगर लेव्हल कमी करते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी मिरची खाणं गरजेचे आहे. हिरवी मिरची  शरीरातील मेद कमी करुन मेटाबॅालिजम वाढवते.हिरव्या मिरच्यामध्ये असलेले पोषक घटक आपल्या शरीराचे बॅक्टेरिया नष्ट करतात.


स्ट्रॉबेरी स्मरणशक्ती वाढवते


अनेकांना छोट्या छोट्या गोष्टीही विसरण्याची जणू काही सवयच असते. अशा लोकांना स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारातील काही सुधारणा लाभदायक ठरू शकतात. भोपळ्याच्या बियांसारखे आहारातील काही पदार्थ यासाठी उपयुक्त ठरतात. आता 'न्यूट्रिएंटस्' या नियतकालिकात म्हटले आहे की स्ट्रॉबेरीचे सेवन यासाठी गुणकारी ठरू शकते.

रश युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे अध्ययन केले आहे. स्ट्रॉबेरीमध्ये फ्लॅवेनॉईड आणि 'क' जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात आढळते. हे दोन्ही अँटी ऑक्सिडेटिव्ह' म्हणून ओळखले जातात. ते फ्री रॅडिकल्सना चेतासंस्थेतील पेशींचे नुकसान करण्यापासून रोखतात. त्यामुळे उतारवयात स्मरणशक्ती कमजोर होण्याची समस्या राहत नाही.

एकाच वेळी अनेक कामे करणे, योग्य-अयोग्य हे समजून घेणे तसेच निर्णयक्षमता यासाठी त्यांचा लाभ होतो. अल्झायमर्स व डिमेन्शियासारख्या उतारवयातील विस्मृतीशी संबंधित आजारांना रोखण्यासाठीही स्ट्रॉबेरी लाभदायक ठरते. पाहणीमध्ये आढळले की ज्या लोकांनी आठवड्यातून दोन ते तीनवेळा स्ट्रॉबेरी खाल्ली त्यांना या दोन्ही आजारांचा धोका ३४ टक्क्यांनी कमी झाला. हृदयरोग व स्ट्रोकपासून वाचवण्यासाठीही स्ट्रॉबेरी गुणकारी आहे, असे यापूर्वी दिसून आले होते.

स्ट्रॉबेरीचे आणखीही काही फायदे : यात सोडियम, चरबी, कोलेस्ट्रॉल नसते आणि कमी कॅलरीयुक्त आहार म्हणून स्ट्रॉबेरी उत्तम पर्याय आहे. स्ट्रॉबेरीमध्ये मॅंगनीज, व्हिटामिन सी, पोटॅशियम आणि व्हिटामिन बी 9 असते.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील हे फळ चांगले मानले जाते आणि म्हणूनच हंगामात स्ट्रॉबेरी खाणे आवश्यक आहे. जर आपण ताजे स्ट्रॉबेरी घेऊ शकत असाल, तर ते चांगले आहे. कारण स्ट्रॉबेरीचे सेवन आपल्याला हृदयरोग आणि मधुमेहपासून मुक्त करू शकते. आपण कोणत्याही प्रकारे स्ट्रॉबेरी खाऊ शकता, परंतु या हंगामात ते आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजे.

Thursday 13 May 2021

मधुमेहाच्या रुग्णांना दालचिनीचे सेवन लाभदायक


दालचिनी
 हा एक मसाल्याचा पदार्थ आहे,हे आपल्याला माहीत आहे. स्वयंपाकघरात वापरावयाची दालचिनी म्हणजे झाडाच्या आतील खोडाच्या सालीची पुंगळी असते. पारंपरिक काळापासून दालचिनीचा स्वयंपाकात व आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला गेला आहे. दालचिनीला कलमी देखील म्हंटले जाते. दालचिनी हा एक अत्यंत स्वादिष्ट मसाला आहे. हा त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी हजारो वर्षांपासून प्रसिद्ध आहे. दालचिनी हा एक मसाला आहे जो वैज्ञानिकदृष्ट्या दालचिनी म्हणून ओळखला जातो, तो झाडांच्या आतील सालातून बनविला जातो. जेव्हा ते कोरडे वाळते, तेव्हा त्याच्या पट्ट्या बनवतात ज्या रोलमध्ये गुंडाळतात, ज्याला दालचिनी स्टिक्स म्हणतात. याचा मधुमेही लोकांना फायदा होतो, असे अलीकडच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील शर्करेचा स्तर नियंत्रित
ठेवणे एखाद्या आव्हानासारखेच असते. त्यासाठी त्यांना रोजच अनेक प्रकारची सावधगिरी बाळगावी लागत असते. मधुमेहामुळे अनेक प्रकारच्या खाण्या-पिण्यावर निर्बंध येत असतात. अशा स्थितीत दालचिनीचे सेवन करणे मधुमेहाच्या रुग्णांना लाभदायक ठरू शकते, असे संशोधकांना आढळले आहे.
एंडोक्राईन सोसायटीच्या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार थोड्या दालचिनीचे सेवन किंवा दिवसातून तीनवेळा
दालचिनीच्या कॅप्सूल्स खाल्ल्याने शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे किंवा वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी मदत मिळू शकते. याबाबतची पाहणी 51 प्रो-डायबिटिक रुग्णांवर करण्यात आली होती. त्यांना दिवसातून तीनवेळा 500 मिलीग्रॅम दालचिनी
कॅप्सूल्स देण्यात आले. अनेक भारतीय खाद्यपदार्थांमध्ये दालचिनीचा वापर करण्यात
येतो. भारतीय मसाल्यांमध्ये या 'सिनामोमम' झाडाच्या खोडातील सालीचा शेकडो वर्षांपासून वापर केला जातो. दालचिनीत 'सिनामाल्डेहाईड' नावाचे संयुग असते. ते चयापचय क्रिया व आरोग्यासाठी गुणकारी असते. दालचिनीत अँटिऑक्सिडंटसही असतात. तसेच दालचिनीतील अँटइन्फ्लेमेटरी गुण शरीराचे संसर्गापासून रक्षण करते. हृदयाच्या आरोग्यासाठीही दालचिनी गुणकारी आहे.

Sunday 2 May 2021

पोषण घटकांचे भांडार :अळू


चटकमटक खाण्याची सवय असलेली माणसं अळू, मेथी,शेपू अशा भाज्यांकडे पाहून तोंड वेंगाडतात. मात्र, अशा अनेक भाज्यांमध्ये शरीराला आरोग्य प्रदान करणारे अनेक पोषक घटक असतात हे विसरले जाते. तज्ज्ञांनी म्हटले आहे की शरीरातील पोषक घटकांची कमतरता दूर करण्यासाठी अळूसारख्या भाज्या अत्यंत लाभदायक आहेत. अळूमध्ये पोषक घटकांचे भांडारच असते. अळू हे कार्बोहायड्रेटस् आणि प्रोटिनचे उत्तम स्रोत असते. अळूच्या कंदामध्ये बटाटा किंवा रताळ्यापेक्षाही अधिक स्टार्च असते. अळूच्या पानांमध्ये 'अ' जीवनसत्त्व, फॉस्फरस, कॅल्शियम, आयर्न आणि बीटा कॅरोटिन असते. नवी दिल्लीतील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. आनंद कुमार सिंह यांनी सांगितले की अळूच्या प्रत्येक पानात एस्कार्बिक अॅसिड, फोलिक अॅसिड, रायबोफ्लेविन, 'ब' जीवनसत्त्व, बी-सायटोस्टेरॉलसारखे घटक असतात. अनेक खनिजे अळूच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. 'थियोनिन' नावाचे अमिनो अॅसिडही अळूच्या पानांमध्ये असते. शरीरात रक्ताची कमतरता असल्याचे अळू उपयुक्त ठरतो. 

अळूची पानांना ‘अरबी के पत्ते’ किंवा ‘कोलोकॅशिया लीव्हज्’ असे म्हटले जाते.  हे संपूर्ण झाडच पोषणयुक्त आहे.  अळूची पाने, त्याचे देठ आणि मुळेसुद्धा स्वयंपाकात वापरली जातात आणि त्यांच्यातून खूप उच्च पोषण मिळते. मात्र, हे घटक कधीही कच्चे खाता कामा नयेत. अळूची पाने अगदी सहज उपलब्ध होतात आणि  स्वस्त असतात.  अळू अँटिऑक्सिडंट्सने युक्त असतो आणि त्यामुळे आजार रोखण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी अळू खूप चांगला असतो. अळू हा व्हिटॅमिन ‘ए’चा अतिशय चांगला स्रोत आहे. दृष्टी सुधारण्यासाठी हे व्हिटॅमिन अतिशय महत्त्वाचे असते.   व्हिटॅमिन ‘सी’चा उत्तम स्रोत; जो प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करतो.   त्यांच्यात पोटॅशिअम आणि फोलेटही उत्तम प्रमाणात असते; ज्यामुळे तुमचे हृदय आरोग्यदायी राहते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.  या पानात असलेले फायबर्स (तंतू) तुमची पचन यंत्रणा उत्तम राहण्यासाठी मदत करतात.   अळूमध्ये लोह, फॉस्फरस, झिंक, व्हिटॅमिन ‘बी ६’, व्हिटॅमिन ‘सी’, कॉपर आणि मॅंगेनीझही असते. हे सगळे घटक आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. 

अळूमुळे रक्तदाब कमी होऊ शकतो, त्वचेची जपणूक होते.  पचनशक्ती सुधारते. पचन यंत्रणा मजबूत होते.  हृदयरोगांना प्रतिबंध होतो.  दृष्टी सुधारते.  प्रतिकारशक्ती वाढते.   स्नायू आणि चेतासंस्था यांची ताकद वाढते.  ढाळ, क्रॅंपिंग, बद्धकोष्ठता, पोट फुगणे, गॅसेस या सगळ्या गोष्टींना अळूमुळे प्रतिबंध होतो आणि शरीराचे एकूण आरोग्य सुधारते. (अनिकेत फिचर्स)