Wednesday, 29 January 2020

टोमॅटो रसाचे सेवन

टोमॅटो कच्चा आणि शिजवून अश्या दोन्ही प्रकारे खाल्ला जाऊ शकत असून, याच्या रसाचे सेवनही आवर्जून केले जात असते. या रसामध्ये क्षार, जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असून, यामध्ये अँटी ऑक्सिडंट्सही मोठ्या प्रमाणावर आहेत. या रसाच्या नियमित सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. पण ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे या रसाच्या सेवनाला फायदा आणि नुकसान या दोन बाजू आहेत. या फळामध्ये क्षार आणि जीवनसत्वे मुबलक मात्रेमध्ये असली, तरी यामध्ये कबरेदके आणि प्रथिने मात्र जवळजवळ नाहीतच. त्यामुळे या रसाचे सेवन करताना शरीराला आवश्यक ती कबरेदके आणि प्रथिने मिळतील या दृष्टीने आहार घेतला जावा. टोमॅटोमध्ये लायकोपीन असून, यामुळे शरीराला रोगप्रतिकारशक्ती लाभते.

Tuesday, 28 January 2020

कानात तेल घालणे अयोग्यच, बुरशीची शक्यता

कानाची काळजी घ्या
कान सुकला, कानात खाज येऊ लागली किंवा कानात दुखत असेल तर अनेक जण कानात तेल घालतात. मात्र कानात तेल घालणे योग्य नसल्याचे तज्ञ म्हणतात. लहानपणी आपली आजी किंवा आई आपण झोपल्यानंतर आपल्या कानात तेल घालायची. आता तुम्हीदेखील तुमच्या मुलांच्या कानात तेल घालता. कानात तेल घालणे चांगले असते, त्यामुळे कानात मळ साचत नाही असे म्हटले जाते. मात्र, कानात तेल टाकणे हे अयोग्य असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

हे माहीत आहे का?

सद्य:स्थितीत रक्तगटांविषयी बहुतेकांना माहिती असते. कोणत्या रक्तगटाचे रक्त कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला चालतं याचीही बर्‍यापैकी माहिती असते. परंतु रक्तगटाशी संबंधित धोक्यांबाबत फारसं जाणून घेतलं जात नाही. आज त्याचीच माहिती घेऊ..
लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावर अँटिजेन्स नामक घटक असतात. यामुळे प्रत्येक रक्तगटाच्या व्यक्ती काही प्रकारच्या विकारांचा प्रतिकार करू शकतात तर काही विकारांना बळी पडू शकतात. ए, बी, ओ आणि एबी हे प्रमुख रक्तगट आहेत. रक्तगटाचं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असणं आरएच या घटकावर अवलंबून असतं. आरएच हा सुद्धा अँटिजेन आहे. रक्तगटाशी संबंधित विकार होऊ नये या हेतूने आपण जीवनशैलीशी संबंधित बदल करू शकतो. 

नकारात्मक विचार टाळा

सध्याच्या धावपळीत सतत काही ना काही समस्या येत असतात. त्यामुळे माणूस सतत तणावाखाली असतो. या तणावात माणसाच्या मनात एक प्रकारची भीती उद्भवते. या भीतीतून नकारात्मक विचार यायला लागतात. पण हे नकारात्मक विचार आपल्याला आणखीणच तणावाच्या खाईत लोटतात. त्यातून मनात सातत्याने येणारे नकारात्मक विचार आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर विपरीत परिणाम घडवून आणतात. हे टाळण्यासाठी आपल्याला सातत्याने सकारात्मक विचारांचा पाठलाग करायला हवा आहे. यासाठी काही गोष्टी करणे भाग आहे.

Sunday, 26 January 2020

गरम पाणी पिण्याचे फायदे

बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीच्या गरमागरम कपाने करीत असतात. काही लोकांना तर सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी मिळाली नाही, तर त्यांचा अख्खा दिवस वाईट जातो, इतकी त्यांना चहा किंवा कॉफीची सवय झालेली असते. पण या सवयीमुळे कालांतराने बद्धकोष्ठ, पोटदुखी, अँसिडीटी, पिंपल्स अश्या तक्रारी सुरु होतात. असे म्हटले जाते की त्वचा, केस आणि एकंदर शरीराचे आरोग्य सांभाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास गरम पाणी पिण्याची सवयही तुमच्या शरीरातील अनेक विकार मुळापासून करू शकते.

Friday, 24 January 2020

केस गळतीने हैराण

मित्रांनो, आजकाल ऐन तारुण्यात केस गळतीच्या समस्येत वाढ दिसून येत आहे. ही चिंतेची बाब ठरते. खरं तर केस गळणं ही समस्या वाटते तितकी साधी नाही. यामागे बरीच कारणं असू शकतात. परंतु काही घरगुती उपायांनी केस गळण्याचं प्रमाण कमी करता येईल.
* बीटमध्ये बरेच पोषक घटक असतात. बीटचा रस प्यायल्यामुळे बरेच लाभ होऊ शकतात. बीट फक्त केसांसाठी नाही तर सर्वांगिण आरोग्यासाठी चांगला असतो. आठवड्यातून तीन वेळा बीटचा रस प्या.

Thursday, 23 January 2020

खरंच!शीतपेये प्यायची गरज आहे का?

मधुमेह, लठ्ठपणा,हृदयरोगाला  आमंत्रण
उकाडा असेल किंवा जास्त दमल्यावर अनेकजण-शीतपेय घेतात. पण ,खरंच शीतपेय पिण्याची गरज आहे का? ज्याची शरीराला गरज नाही,असे हे शीतपेय आहे. वास्तविक, शीतपेय घेणे चांगले नसते. त्यामध्ये घातक घटक असतात, असे अनेकदा ऐकतो. मात्र तरीही शीतपेये घेण्याची सवय अनेकांना असते. जंक फूड जसे घातक असते, तसेच शीतपेयेही घातक असतात. त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. शीतपेयांचा शरीरावर अनिष्ट परिणाम होतो. खरंतर शीतपेये ही अनैसर्गिक पेये आहेत. ज्यांचे पोषणमूल्य नगण्य असून, शरीरस्वास्थ्य हानिकारक, असे कार्य असते.

आले खाण्याचे फायदे

खूप थंडी आहे, हुडहुडी भरलीये.. चल जरा आलं घातलेला मस्त गरमागरम चहा पिऊ.. थंडी म्हटलं की आलं घातलेला चहा आलाच.. असा आल्याचा चहा प्यायलाने शरीराला थोडी गरमी मिळते..फक्त शरीर गरम राहावं म्हणून नाही तर थंडीत आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात आणि अशा अनेक समस्या दूर करण्याचे गुणधर्म आल्यामध्ये आहेत. त्यामुळे फक्त चहातूनच नव्हे, तर वेगवेगळ्या प्रकारे आल्याचं सेवन करा आणि थंडीतील आरोग्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळवा. थंडीमध्ये आल्याचे नेमके काय फायदे आहेत जाणून घेऊ या.

मशरूम खाण्याचे फायदे

अनेकांना मशरूम खायला आवडत नाही. काहीजणांना आवडत असतं. काहीजण घरी असताना मशरून खात नाहीत पण बाहेर कुठेही जेवायला गेल्यावर त्यांना मशरून खावसं वाटत असतं. कारण अनेक पदार्थांना वेगळी चव येण्यासाठी किंवा त्या पदार्थाचे टेक्सचर बदलण्यासाठी मशरूम उपयोगी ठरतं असत. म्हणूनच पिज्जा किंवा बर्गर मध्ये सुद्धा मशरूमचा आवर्जून वापर केला जातो. आज आम्ही तु्म्हाला मशरूमच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही स्वत:च आरोग्य नीट ठेवू शकता.मशरूममध्ये मोठय़ा प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणार्‍या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे.

पाणी पिण्याचे फायदे

महाराष्ट्र शासनाने पाणी पिण्यासाठी खास बेल वाजवण्याची व्यवस्था केली आहे आणि तसे आदेशही दिले आहेत. त्यामुळे राज्यातल्या शाळांमध्ये आता दर दोन तासांनी मुलांना पाणी प्यायची आठवण होण्यासाठी व पाणी पिण्यासाठी बेल वाजवली जात आहे. या नियमांचे काटेकोर पणे अंमलबजावणी होते की नाही माहीत नाही,पण यातून थोड्या थोड्या अंतराने पाणी पिणे आवश्यक आहे,हेच यातून अधोरेखित होते. दिवसभरात आवश्यक त्या प्रमाणात पाणी पिणं आरोग्यदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं ठरतं, असं कितीही सांगितलं तरी त्याकडे बर्‍याचदा दुर्लक्ष केलं जातं आणि त्यातून विविध व्याधींचा सामना करावा लागतो.  भरपूर पाणी पिण्याचे फायदे अनेक आहेत.

Wednesday, 22 January 2020

योग्य तेच खा. शिडशिडीत रहा

सध्याचा जमाना वजन घटवणार्‍यांचा आहे. चित्रपटातील नायक-नायिका यांच्या नादाला लागून सध्याची तरुण पिढी स्लिम फिगरवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. पण आता अशा लोकांसाठी एक चांगली बातमी आली आहे. तथाकथित डाएटच्या नावाखाली जे उपाशी राहावे लागत आहे, ते बंद होण्याच्या मार्गावर आहे, असे म्हणायला हरकत नाही. नवीन संशोधनानुसार वजन घटवण्यासाठी पूर्णत: उपाशी राहाणे आवश्यक नसते. तर योग्य आहार आणि तो योग्य प्रमाणात घेतल्यास वजनावर नियंत्रण मिळवता येते.गेल्या काही वर्षात वजन घटवण्याच्या, स्लीम फिगर मिळवण्याच्या मागे विशेषत: तरुण पिढी लागली आहे. आणि याच प्रयत्नात सुदृढ व निरोगी शरीर या संकल्पनेच्या व्याख्या संपूर्णत: बदलून गेल्या आहेत.

मीठाचा अतिरेक धोक्याचा

मीठ हा आहारातला अत्यावश्यक घटक असला तरी त्याचं प्रमाण र्मयादित असणं गरजेचं आहे. मीठाचं अतिरिक्त सेवन आरोग्यविषयक अनेक प्रश्नांना जन्म देतं. मीठाच्या अतिरिक्त सेवनानं उच्च रक्तदाब, हृदयविकार, जाडी अथवा पक्षाघात यासारखे धोके वाढतात. त्यामुळेच मीठाऐवजी सैंधव वापरणं उपकारक ठरतं. शरीरात मीठाचं जास्तीचं प्रमाण कमी करण्यासाठी काही पथ्य पाळायला हवी.  आहारातील बीन्सचं प्रमाण वाढवल्यास शरीरातील मीठाचं प्रमाण कमी होण्यास मदत होते.

Tuesday, 21 January 2020

हिंगाचे आरोग्यदायी फायदे

विविध पदार्थांमध्ये वापरला जाणरा महत्त्वाचा घटक म्हणजे हिंग. हिंगामुळे पदार्थांना विशिष्ट चव प्राप्त होते. परंतु हिंगामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. त्यात पोटाचे विकार तसेच पचनासंबंधीच्या तक्रारींवर हिंग गुणकारी ठरतो, हे बहुतेकांना माहीत आहे. मात्र, या व्यतिरिक्तही हिंगाचे आरोग्यदायी लाभ आहेत. त्या विषयी जाणून घेऊ..

Monday, 20 January 2020

कोरड्या खोकल्याचा त्रास होतोय तर हे करा

संक्रांतीनंतर थंडी हळुहळू कमी होत असली तरी सध्या थंडीचा कडाका वाढत आहे. अशा वाढत्या थंडीमुळे खोकल्याचा त्रास जाणवतो. विशेषत: रात्रीच्या वेळी खोकल्याचं प्रमाण वाढतं. औषधांसोबतच काही घरगुती उपायांनीही लवकर आराम पडू शकतो. त्यामुळे औषधोपचारांसोबत हे उपचार करून बघायला हरकत नाही. अशा उपचारांविषयी..

शांत झोप हेच खरे डिप्रेशनवरचे औषध

रात्री जर शांत झोप झाली नाही तर त्यामुळे नैराश्य तीस टक्क्यांनी वाढते. जर रात्रीची झोप व्यवस्थित असेल तर तुमच्या भावनाही स्थिर राहतात, असे नैराश्यावरील संशोधनात दिसून आले आहे. नैराश्यावर औषधांचा वापर न करता उपाय करण्यावर भर देण्यात येत आहे. 'नेचर हय़ूमन बिहेवियर' या नियतकालिकातील शोधनिबंधात म्हटले आहे, की ज्यांचे मानसिक आरोग्य बिघडलेले आहे त्यांच्यात नैराश्य, चिंता ही खरी कारणे असतात. काही वेळा या लोकांमध्ये भीतीची भावनाही बळावलेली असते. पण याचे मूळ कारण त्यांची झोप शांत नसणे हे आहे.

Sunday, 19 January 2020

असं टिकावा फिटनेस

अनेकजण नियमित व्यायाम करतात. शक्यतो जीम टाळत नाहीत. मात्र आजारपण, प्रवास किंवा इतर कामांमुळे अधूनमधून व्यायाम चुकतो. कितीही प्रयत्न केला तरी ३६५ दिवस व्यायाम करणं शक्य नसतं. मात्र आठवड्यातले एखाद-दोन दिवस व्यायाम चुकला तरी अनेकांना खूप वाईट वाटतं. आपलं वजन वाढेल की काय, सगळी मेहनत पाण्यात जाईल की काय असे विचार मनात येतात. पण अधूनमधून व्यायाम चुकविल्यामुळे शरीर बेढब होत नसतं हे लक्षात घ्यायला हवं.

गुणकारी वेलची

वेलदोडे अथवा वेलची हा मसाल्याच्या पदार्थांमधील एक महत्त्वाचा घटक आहे. वेलचीमुळे पदार्थाला छान चव आणि मंद सुगंध मिळतो. विविध सरबतांमध्येही वेलदोड्याची पूड वापरली जाते. जेवणाचा स्वाद वाढवणारी छोटीशी वेलची आरोग्याच्या दृष्टीनंही गुणकारी असते. मसाल्याचे आणि साधे असे वेलदोड्यांचे दोन प्रकार असतात. विशिष्ट प्रकारच्या सुगंधामुळे अरोमा थेरपीतही वेलचीचा वापर केला जातो.

Saturday, 18 January 2020

तंदुरुस्तीसाठी मदत करणारे अ‍ॅप्स


अलिकडे बरेचजण आपल्या शरीराकडे काळजीने पाहायला लागले आहेत. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. यात फिटनेस अॅप्सदेखील मागे नाहीत. जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचम आहे, वजन वाढवायचं आहे. धावायचं आहे किंवा पोहायचं आहे. त्याचबरोबर रोज चालायचं आहे. यासाठी मार्गदर्शन कारणारे अॅप्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. त्यातल्या काही फिटनेस अॅप्सची ओळख करून देत आहे. या अॅप्सच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यास मदत होणार आहे. पाहूया काही फिटनेस अॅप्स...