Wednesday 21 April 2021

फायदे नारळ पाणी पिण्याचे


• नारळ पाण्यामध्ये इलेट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मैंगनीज, जीवनसत्व क आणि फोलेट यासारखे पौष्टिक घटक असतात.

• नारळ पाण्यात नैसर्गिक साखर असते. त्यामुळे आपल्या शरीराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर त्याचा काहीही विपरीत परिणाम होत नाही.

• नारळ पाण्यामध्ये ९४ टक्के पाणी असते. त्यात चरबीचे प्रमाण खूप कमी आहे. २५० मिलि नारळाच्या पाण्यात कर्बाचे प्रमाण-९ ग्रॅम, तंतू-३ ग्रॅम, प्रथिने-२ ग्रॅम, जीवनसत्त्व क- १० टक्के, मॅग्नेशिअम-१७ टक्के, सोडियम- ११ टक्के, कॅल्शिअम- ६ टक्के असते. तसेच ते मानवाच्या शरिरात चांगल्या प्रकारे परिणामकारक ठरते.

• शरीरातील ग्लुकोजची पातळी चांगली ठेवली असल्यामुळे उन्हाळ्यात नारळ पाणी सेवन करणे चांगले असते.

• नारळ पाणी प्यायल्यामुळे पोटातील जळजळ, अल्सर, कोलायटिस, आतड्यांमधील जळजळ यांसारख्या पोटाच्या समस्येपासून आराम मिळतो. तसेच आपल्या शरीरास ऊर्जा देण्याचे कार्य करते. अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे यांसारख्या समस्यांतून सुटका होते.

• नारळाच्या पाण्यात जीवनसत्त्व सी, मॅग्नेशिअम आणि पोटॅशियम यासारखे पोषक गुणधर्म मुबलक प्रमाणात असल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

• फेसपॅक म्हणून देखील याचा वापर केला जातो.

• उन्हाळ्यात टॅनिंग काढून टाकण्यासाठी नारळाच्या पाण्याने आपला चेहरा धुतल्यामुळे टॅनिंग कमी होते, चेहरा थंड राहतो.

• नारळ पाणी पिण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो. (अनिकेत फिचर्स)


No comments:

Post a Comment