Wednesday 30 October 2019

हिवाळ्यात ठेवा हृदय रोगांवर नियंत्रण

 
देशात दरवर्षी हृदयविकाराची संख्या वाढत आहे आणि  दरवर्षी 24 लाख लोकांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका बनतो आहे.   एका नव्या संशोधनात म्हटलं आहे की, हे हृदयविकाराचा फास  तारुण्यापासूनच भारतीयांभोवती आवळा जात आहे.  विकसित देशांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या  आजारामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या 22.8 टक्के आहे, तर भारतात 70 वर्षांखालील 52.2 टक्के मृत्यू या आजारामुळे होत आहेत.   हृदयविकाराचा झटका  10 ते 14 टक्के शहरी भागातील लोकांना येतो आहे तर ग्रामीण भागातील प्रमाण  5 ते 7 टक्के इतके आहे.

पुरुषांना मोठा धोका
 शारीरिक श्रमाशिवायची जीवनशैली, स्पर्धात्मक वातावरण आणि कामाचा दबाव हृदयसंबंधी रोगांचे मुख्य कारण आहे.  या समस्या लठ्ठपणा, रिफाईंड कार्बोहायड्रेट्स किंवा कोलेस्ट्रॉलचे अधिक प्रमाणात सेवन यामुळे देखील वाढतात.  रक्तदाब आणि मधुमेहदेखील याची कारणे आहेत. धूम्रपान आणि मद्यपान करणार्‍यांमध्ये हा आजार होण्याची शक्यता अधिक आहे.
उपचार प्रक्रिया
 रूग्णाला शक्य तितक्या लवकर रुग्णालयात नेले पाहिजे, जेणेकरून रक्त गोठण्या किंवा गुठळ्या होण्यापासून रोखता येईल.  अटॅकची लक्षणे दिसताच तोंडात 300 मिलीग्रामची एस्पिरिन टॅब्लेट घेतल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची मृत्यूची लक्षणे 22 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात.
जर छातीत दुखत असेल तर ...
 आपल्याला हृदयविकाराचा झटका येताच, आपण आपल्या हातांनी रुग्णाच्या छातीवर जोरदार दबाव आणला पाहिजे, जेणेकरून हृदयाचे पम्पिंग होईल. एका मिनिटात शंभर वेळा पंपिंग होणे गरजेचे आहे. पंपिंग करताना 10 सेकंदांपेक्षा जास्त थांबू नका.  छातीत दुखत असल्यास, इस्पितळात पोहोचल्यानंतर लगेचच ईसीजी करवून घ्या आणि हे लक्षात ठेवा की यास 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही.  शक्य तितक्या लवकर, रुग्णाने रुग्णालयात पोहोचण्याचीही व्यवस्था केली पाहिजे.
 रोज एका मिनिटात 80 पावलं चाला, 80 मिनिटांपर्यंत ब्रिस्क वॉक करा.  एका वर्षात 80 मिलीलीटरपेक्षा जास्त आणि एका आठवड्यात 80 ग्रॅमपेक्षा जास्त अल्कोहोल न घेतल्यास हृदयविकाराचा धक्का  टाळता येईल.

No comments:

Post a Comment